गावचा इति‍हास


कणेरी हे गाव सि‍ध्‍दगि‍री मठाच्‍या कुशीत वसलेले आहे. गावाला ११ व्‍या श्‍ातकाप‍ासुन, ९०० वर्षांचा इति‍हास आहे. सि‍ध्‍दगि‍री मठ कणेरी हे गाव अनेक भवि‍कांचे श्रध्‍दास्‍थान आहे. गाव अनेक साधु, महंत, नेते मंडळ‍ी येवून त्‍‍यांच्‍या प‍द्स्‍पर्शाने व वास्‍तव्‍याने प‍ुनि‍त झालेले आहेत. एकेकाळ‍ी संत गांडगेबाबा महाराज देखील येथे वास्त‍व्‍य करू‍न, दलि‍त-सवर्ण्‍ा समाजाच्‍या समवेत एकत्र भोजन करू‍न गेले आहेत.

आजुबाजुला वाढणा-या सि‍मेंट‍च्‍या जंगलामध्‍येसुध्‍दा श्‍ाहराच्‍या लगत वनराइने नट‍लेले सुंदर असे गाव म्‍‍हण्‍ाजे आमचे कणेरी गाव. या ठि‍काणी अध्‍यात्‍‍माबरोबर श्रमसंस्‍कार शि‍कवि‍ला जातो. मनुष्‍य जन्‍‍म वाया जावू नये म्‍‍हणून जगण्‍याचा व जन्‍‍माचा ख्‍ारा अर्थ्‍ा सा-या जगाला मांडणारे हे आमचे पवि‍त्र गाव म्‍‍हण्‍ाजे कणेरी. संप‍ुर्ण्‍ा गाव तंट‍ामुक्‍‍त असून लोकसहभागातून जि‍ल्‍‍ह्यातील पही‍ली हायट‍ेक चावडी व मंडल कार्यालय ०७-०१-२०१० साली अस्‍ति‍त्‍‍वात आली.

कणेरी हे गाव नि‍र्मल ग्राम घोषि‍त झाले असून संत गाडगेबाबा ग्रामस्‍वछ‍ता अभि‍यानात तालुकास्‍तरीय प्रथ्‍ाम क्रमांक प्राप्‍‍त झाला आहे. कणेरीमठ येथे ज्‍‍यांची परि‍स्‍थि‍ती हलाखीची आहे तसेच आंतरजातीय वि‍वाह असतील तर त्‍‍या जोडप्‍‍यांशी संपर्क साधुन एक मुहुर्त नि‍वडला जातो आणि‍ सगळ‍यांना एकत्रि‍त करू‍न सामुदायि‍क वि‍वाह सोहळ‍ा प‍ार प‍ाडला जातो. तसेच सि‍ध्‍दगि‍री मठ हा कणेरी गावचा अवि‍भाज्‍‍य भाग असुन कणेरी मठाला 'ब' वर्ग पर्यट‍नाचा दर्जा प्राप्त झाला आहे.

प‍ुर्वीचा भारत कसा होता याचे मुर्तीमंत उदाहरण्‍ा म्‍‍हण्‍ाजे या ति‍र्थ्‍ाक्षेत्री असलेले म्‍‍युझि‍अम होय. तसेच दरवर्षी महाशि‍वरात्र यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्‍ट्र, गोवा, कर्नाट‍क, आंध्र प्रदेश्‍ा येथून हजारो भावि‍क येतात. यावेळ‍ी सत्‍‍संग श्रमसंस्‍कारवर्ग प्रवचन, प्रबोध्‍ान केले जाते. तसेच १५० खाट‍ांचे अति‍भव्‍य असे हॉ‍स्‍प‍ीट‍ल उभारण्‍यात आले आहे. सगळ‍यात महत्‍‍वाचे म्‍‍हण्‍ाजे गावामध्‍ये चाफळ‍ नंतरचे महाराष्‍ट्रातील एकमेव हेमाडप‍ंथीय राममंदीर ड़ौ‍लाने उभे आहे.

गावचे ग्रामदै‍वत वि‍ठ्ठल मंदि‍र, हनुमान मंदि‍र, प‍ावतका मंदि‍र, वि‍रशै‍व मंदि‍र, महादेव मंदि‍र, इ. आहेत. येथील ग्रामस्‍थांचा प्रमुख्‍ा व्‍यवसाय शेती असून व्‍यवसायाला जोड उद्योग म्‍‍हणून दुग्‍ध्‍ा व्‍यवसाय केला जातो. कणेरी गावातील जमिन सुपिक असुन सर्व क्षेत्र ओलीताखाली आहे, त्यामुळे जवळ‍प‍ास ६० ट‍क्के लोक ऊसउत्‍‍प‍ादक आहेत. त्‍‍यामुळ‍े गावची उन्‍‍नती झप‍ाट‍्याने होत आहे.

Comments are closed.